Close Visit Mhshetkari

या तारखेपासून सरकारी कर्मच्याऱ्यांसाठी मोदी सरकारची ही योजना लागू होणार, जाणून घ्या सर्व माहिती

Created by satish, 06 march 2025

Employees scheme :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून मोदी सरकारची एक योजना लागू होत आहे, ज्याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

यूपीएस योजनेचे वैशिस्ट्य

युनिफाइड पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देण्याची तरतूद आहे.किमान 25 वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांत त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निम्मे पेन्शन मिळेल. Employees pension update

25 वर्षांपेक्षा कमी काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात निर्धारित केली जाईल आणि योजनेसाठी किमान सेवा कालावधी 10 वर्षे निश्चित करण्यात आला आहे.

किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये देण्याची तरतूद आहे.कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा पतीला कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाईल.हे पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपूर्वीच्या निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के असेल. Employee update

पर्याय निवडावा लागेल

1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या आणि NPS चा पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांनाच UPS मध्ये रुजू होण्याची संधी मिळेल.

सध्याचे केंद्र सरकारी कर्मचारी आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांना NPS अंतर्गत UPS निवडण्याचा पर्याय असेल.किंवा UPS पर्यायाशिवाय NPS सुरू ठेवा.एकदा पर्याय निवडला की तो बदलता येत नाही. Employees update

नोकरदारांना हातभार लावावा लागेल

UPS द्वारे पेन्शन मिळविण्यासाठी, किमान 10 वर्षे सेवा आवश्यक आहे.एनपीएसच्या धर्तीवर येथेही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% योगदान द्यावे लागेल.सरकार 18.5% योगदान देईल.म्हणजेच या योजनेत कर्मचारी आणि सरकारचे एकूण योगदान 28.5 टक्के असेल. Employees news

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial